खरं म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं,
शाळा सोडण्यात एवढ़ं काय विशेष होतं;
मुली मात्र शेवटच्या दिवशी सारख्या रडत होत्या
सरांपासून शिपाई पर्यंत सर्वांच्या पाया पडत होत्या;
मला आठवतंय आम्ही रडणा-या मुलींची जाम खेचली होती,.
खरं तर डोळ्यातलं पाणी लपवताना आमची ही गोची झाली होती;
एकमेकांकडे पाहुन लगेच सावरलं आम्ही स्वत:ला,
मनाशीच म्हटलं आता उगीच रडायाचं कशाला?
भले शाळेतली काही जुनी 'नाती' तुटतील,
त्यात काय एवढं कॉलेज मध्ये 'नवीन' भेटतील...
दिवस, वर्षं कशी जातील कळणार नाहीत,
पुन्हा कधी पावलं इथे वळणार नाहीत...
रडावसं वाटत होतं पण कुणीच रडलं नाही,
शाळेतुन बाहेर पडताना वळुन ही पाहिलं नाहीं....
पण आता मात्र मनापासून शाळेत जावसं वाटतंय,
शेवटच्या बाकावर बसावसं वाटतंय...
शाळेतल्या तासांपेक्षा सुट्टीचीच सर्वाना ओढ़ असायची,
कारण तेव्हाच सर्वांना 'आपली माणसं' भेटायची....
आज मात्र बरोबर कुणीच नसतं,
शाळेच्या आठवणीने रडताना;
असं वाटतं तेव्हाच रडायला हवं होतं;
I Miss my school days a lot....
: आठवा ते दिवस...
डोळ्यात पाणी येईल...
पुन्हा नाही येणार हे दिवस...
गेले ते दिवस ,राहिल्या त्या आठवणी
माझी शाळा,माझे मित्र.
No comments:
Post a Comment